Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

किल्ले सिंहगड

                           किल्ले सिंहगड 
                                
 महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये 'सिंहगड ' हा किल्ल्याचे स्वराजात विशेष स्थान आहॆ. हा किल्ला सह्याद्रीच्या भूलेश्वर रांगेत असून जमिनीपासून ७४० मी. तर समुद्रापासून १३१२ मी उंचीवर आहॆ. पुण्याहून साधारणपणे ३० कि. मी. अंतरावर खडकवासलाच्या बॅकवॉटरला लागून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेत आहॆ. हा गड भौगोलिकरीत्या पाहिल्यास गडाच्या चारी बाजूस तीव्र उताऱ्याचा दरी आहे. त्यामुळे गडावर चढाई करणे शत्रूला अवघड जाते. गडाचा चारही बाजू वनविभागाच्या ताब्यात असल्या कारणामुळे दुचाकीस ३० रु. तर चारचाकीस ५० रु. आकारले जातात. पावसाळ्यात गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटीस येतात. गडाच्या दरवाज्याच्या पर्यंत चारचाकी व दुचाकी जाऊ शकते. वाहनतळाची सुविधा तसेच छोटी छोटी दुकाने आहेत. तुम्हाला तेथे वडापाव, ताक, लस्सी , करवंद, चिंच अश्या सारखे त्या त्या काळातले रानमेवा खाण्यास मिळू शकते
किल्यावर पुणे दरवाजा १,२,३  अनेक छोट्या छोट्या गुहा, खंदकाडावरी बुरुज, दिंडी दरवाजा, तोफखाना, घोड्याची पांगा, लोकमान्य टिळकांचा बंगला १८८९ रोजी लोकमान्य टिळक सिंहगडावर राहण्यास आले. गीतारहस्य व आर्टिक होमली वेदास हे पुस्तक लिहले तसेच टिळक व महात्मा गांधींची भेट सिंहगडावर झाली. गडावर 'देवटाकी' आहार अजूनही त्याचे पाणी पिण्यासाठी वापरतात. गडावर राजाराम महाराजांची समाधी असून त्याचा २ मार्च १७०० साली झाले. कलावती बुरुज, हनुमान मंदिर, तानाजी कडा, झुंझार बुरुज, उदयभानाचे मृत्यू स्थळ, तानाजी मालसुरे याचे स्मारक आहे. कोंढाणेश्वर मंदिर यादवचे कुलदैवत. 
सिंहगडाचे पूर्वीचे नाव 'कोंढवा'. तो पूर्वी मुघलांच्या ताब्यात होता. उदयभान हा एक शूर राजपूत होता. 
व तो ह्या कोंढाणाचा किल्लेदार होता. किल्याच्या दोन्ही गडाच्या दारावर सैनिकांची कुमक मोठ्या प्रमाणात असे व गडाच्या चारी बाजूस खोल दरी असल्यामुळे  असा किल्ला स्वराजात असावा असे माँ जिजाऊची इच्छा शिवाजी महाराजांनी पूर्ण करायची ठरवले असता तानाजी मालसुरे जे महाराजांनी शूर सरदार यांनी स्वतः च्या मुलाचा विवाह सोडून कोंढाणा गड सर करण्याच्या मोहीम स्वतः  हाती घेतली व "आधी लग्न कोंढाणाचे व मग रायबाचे " हे विधान आज ही प्रसिध्द आहे. 
तानाजी मालसुरे शिवाजी महाराजांचा शूर सरदार होता. ते मूळचे महाड येथील उमराठे गावचे तानाजींना माहिती होते कि कोंढणगडावर उदयभान नावाचा किल्लेदार आहे व किल्लेला चोहीबाजूने तीव्र उतार व गडावर कडक पहारा  फक्त गडावरील पश्चिमेकडील कडा सर्वात कठीण असलेले भाग त्यामुळे त्या कडावर सैनिकांची कमी असल्यामुळे तानाजी मालसुरे यांनी ह्या कडावरून गडावर चढाई करण्यासाठी काही सैनिक घेऊन जाण्याचे ठरवले व त्याचा भाऊ सूर्याजी मालसुरे ह्याच्या बरोबर उर्वरित सैनिक गडाच्या दरवाज्यावरून गडावर हल्ला करण्याचे ठरवले. कठीण कडा चढवण्यासाठी त्यांनी घोरपडीचा उपयोग केला. गडावर दाखल होताच तानाजी मालसुरे व मावळ्यांनी शत्रू वर जोरदार हल्ला चढवला उदयभान यास जेव्हा चढाई ची माहिती कळाली आणि त्यांनी जोरदार हल्ला चढवला  तानाजी मालसुरे आणि उदयभान यांच्यात जोरदार लढाई झाले. दोघेही शूर पराक्रमी होते. लढता लढता तानाजी मालसुरे ह्याची ढाल तुटली व तरी त्यांनी हाताला फेटा बांधून उदयभान शी युद्ध केले व दोघे धारातीर्थी पडले. मावळ्यांना जेव्हा आपला सरदार धारातीर्थी पडल्याचे समजले तेःव्हा ते रणांगण सोडून पळू लागले तेव्हा तानाजी मालसुरे यांचे भाऊ सूर्याजी मालसुरे यांनी गडाचे सर्व दरवाजे व कड्यावरचे दोर कापली व म्हणाले " तुमचा बाप येथे मरून पडला आहे कोठे पळता रण सोडून मी गडाचे सर्व दरवाजे बंद केले आणि कड्यावरचे दोर कापले एक तर लढता लढता मरण प्रकारा नाहीतर गडावरून उडया मारून जीव द्या " व गड जिंकला जेव्हा शिवाजी राजेंना तानाजी मालसुरे यांच्या परक्रमाची माहिती समजले तेव्हा त्यांच्या मुखातून "गड आला पण सिंह गेला " त्यामुळे ह्या गडाचे नाव सिंहगड ठेवण्यात आले 
आजही हा गड तानाजी मालसुरे यांचा इतिहास सांगत उभा आहे 

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ - पुणे

रेल्वेने

जवळचे रेल्वे स्थानक - पुणे

रस्त्याने

पुणे शहरापासून ३५-४० किमी. अंतरावर आहे. बसेस उपलब्ध आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा