Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

किल्ले वंदनगड

किल्ले वंदनगड


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती किल्ले वंदनगड हा किल्ला सातारा जिल्यातील वाई तालुक्यात आहे. हा एक गिरिदुर्ग असूनसमुद्रसपाटी पासून ३८०० फूट उंचावर आहे.  साताऱ्या पासून साधारणपणे २५ कि.मी. अंतरावर तर पुण्यापासून साधारणपणे  ९० व मुंबईपासूनच्या २४० कि.मी अंतरावर हा किल्ला आहे. चंदन वंदन हि एक दुर्गजोडी असून हे किल्ले सह्याद्रीच्या महादेव ह्या उपरांगेवर स्थित आहे.
पुणे सातारा रोडवर भुईंज गाव पासून डावीकडे वळाल्यावर गडावर जाण्याचा मार्ग आहे . गडावर जाण्यासाठी दोन गर्ग आहे. एक इब्राहीमपूर गावाजवळून तर दुसरा बेलमाचीवरून. इब्राहीमपूर गावजळून दुधाणेवाडी वाहनाने जावे व पुढे १ कि.मी. ची चढाई केल्यास गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचता येते. हा सर्वात सोपा मार्ग आहे.गडाचे प्रवेशद्वार द्वार चांगल्या स्थितीत असून गडाच्या प्रवेशद्वारावर किर्तीचक्र व गणेशमूर्ती कोरलेली आहे. पुढे भोजकालीन दरवाजावर दोन   दुसरा मोडी लिपीमध्ये आहे. गडावर एक खंदक आहे. व पाच पाण्याचे तळे आहे. पुढे गेल्यास महादेवाचे छप्परी मंदिर आहे. गडाच्या मध्यभागी एक कोठार असून ते दारुगोळ्याची असावे. गडाचे बालेकिल्ला टेकडीवर असून त्याचे अवशेष आपल्यास पाहावयास मिळते. गडावर अनेक पडकी घराचे अवशेष दिसतात. तसेच चुन्याच्या घाणीचे अवशेष व गडाचा दक्षिणेस एक चोर द्वार आहे.

पुरातन तांब्रालेखानुसार हा किल्ला ११व्य शतकातील असून ह्या किल्ल्याची बांधणी शिलाहार वंशातील राजाभोजणे केली आहे. शिवाजी महारांजानी अफजलखानाच्या वधानंतर सातारा किल्ल्या जिंकल्यावर ह्या गडावर आक्रमण करून हे गड स्वराजात सामील करून घेतले व ह्या गडाचे णव शूरगाड नाव बदलून चंदनगड ठेवले. उचे संभाजी महारांच्या कारकिर्दीत १६८५ मध्ये अमातुल्य खानने ह्या गडावर हल्ला केला. पुढे १६८९ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पुढे तो मोगलांकडे गेला. पुढे १७०७ मध्ये हा किल्ला शाहू महाराजांनी पुन्हा स्वराज्यांत आणला पुढे हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मार्ग - सातारा   - भुईंज -इब्राहिमपूर - दुधांवाडी
          पुणे - सातारा - भुईंज- इब्राहीमपूर-दुगणवाडी 
          मुंबई - सातारा - भुईंज - इब्राहीमपूर- दुधांवाडी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा