Email Subcribtion

Enter your email address:

Delivered by FeedBurner

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०

Raigad Fort

                                       Raigad Fort

Raigad fort is located in the Sahyadri mountain range at a distance of about 25 km from Mahad in Raigad district. Chhatrapati Shivaji Maharaj repaired this fort and built it. In the year 1674, it was declared the capital of the Maratha Empire. There is a ropeway to reach the fort, so you can reach the fort in a few minutes.

There is a man-made lake on the Raigad fort and its name is "Gangasagar Lake". The only way to reach the fort is through the "Maha-Darwaza". In the fort, there is a replica of the throne in the state court, which is facing the gate of the city hall. The part near the throne is designed for sound waves so that the words spoken here at the door of the court can be easily heard up to the throne. Raigad fort has a famous bastion built on a high valley and it is called "Hirkani Buruj".

The ancient name 'Fort Raigad' was used for captivity during the Nizam rule. Shivaji Maharaj laid siege to Ryari on 6 April 1656 and annexed Ryari to Swaraj in May. Later, Shivaji Raja came to know that the Subhedar of Kalyan was taking the treasure to Bijapur and he looted it and brought all the treasure to Raigad and used it for the construction of the fort. He made Raigad his capital to make it difficult to climb the geographical evil and to keep an eye on the maritime trade. The fort has about 1435 steps. To the west of the fort is a diamond tower, to the north is Takmak Tok. There are two tall towers in front of Gangasagar lake. The pillars are said to be about five storeys. . The state pavilion where the coronation of the Maharaja took place is 220 feet long and 124 feet wide. Remains of the market can be seen on the fort at that time.


                                   


How to reach ?:

By plane

The nearest airports are Lohegaon Airport, Pune and Chhatrapati Shivaji Airport, Mumbai, Maharashtra.

By train

For all tourist destinations, Mumbai (CST), LTT, Kurla Terminus, Pune Railway Station and Panvel Railway Station (in Raigad district) are the nearest railway stations for the main routes of Indian Railways. The nearest railway stations of Konkan Railway in Raigad district are Pen, Roha, Veer etc. Panvel Junction is the most important railway station in the district. It is connected to Mumbai (Harbor Line and Central Railway Main Line), Thane (Trans Harbor Line), Roha, Vasai (Western Railway). There is a "Nero Gauge" railway line from Neral to Matheran, called Matheran Hill Railway.

By road

All major cities and tourist destinations in Raigad district are connected by roads with Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) buses. Raigad district is connected to Mumbai by Sion-Panvel Expressway. The Mumbai-Pune Expressway and National Highways pass through Panvel, Khalapur and Khopoli. National Highway 17, which starts at Panvel, passes through the entire district via Poladpur.

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

किल्ले वैराटगड

 किल्ले वैराटगड 


वैराटगड हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील  गिरिदुर्ग आहे. हा गड समुद्रसपाटी पासून ३३४० फूट उंचीवर आहे. हा किल्ला साताऱ्यातील महाबळेश्वर डोंगररांगेत वसलेला आहे. वाई पासून ८ कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून साधारणपणे ९१ कि.मी. अंतरावर तर मुंबईवरून साधारणपणे २३७ कि.मी. आहे. वैराटगड 'शंभू महादेव ' या सह्याद्रीच्या उपरांगेत वसलेला आहे. 


गडाच्या पायथ्यापर्यंत बसने किंवा इतर गाडीने  येता येते. वैराटगडाजवळ पाचवड गाव आहे या गडावर जाण्यासाठी दोन  वाटा आहेत. पहिली उत्तरेकडून पाचवड - व्याजवाडी गावातून तर दुसरी गडाच्या दक्षिणे कडील सरताळे - गणेशवाडीतून जाणाऱ्या वाटेने हा गड खड्या चढाईचा आहे. त्यातल्या त्यात दक्षिण बाजूने गडावर जाणारी वाट थोडी सोयीस्कर आहे. 

गडावर जाताना अनेक पाण्याच्या टाक्या दिसतात. पुढे गडाच्या प्रवेशद्वार पर्यंत पोहोचतो. गडाला एका पाठोपाठ  दरवाजाचे अवशेष दिसतात. पुढे गेल्यावर सदर, वाडे, शिबंदीची घरे अश्या अनके बांधकामाचे ढिगारे दिसतात. गडावर हनुमानाचे मंदिर आहे. ह्या गडावर वैराटेश्वराचे मंदिर आहे. गडाची तटबंदी भग्न अवस्थेत असल्यातरी पूर्वी हा गड  भव्य असावा यांची कल्पना येते. 




गडमाथ्यावरून कृष्णा, वेण्णा नद्या तसेच पांडवगड, मांढरदेव, केंजळगड, रायरेश्वर, खंबाटकी, चंदन-वंदन, नांदगिरी, जर्डेश्वर, मेरुलिंग अशी विविध गिरिशिखरे दृष्टीस दिसतात. 

हा गडाचा इतिहास हा शिलाहार राजा भोजने हा  गड ११७८ ते ११९३ या काळात बांधला. प्राचीन वैराट उर्फ वैरत्नाग्री म्हणजेच आजची वाईचा पहारेकरी म्हणून त्याचे नाव वैराटगड. शिलाहारनंतर यादव, आदिलशाही, मराठा, मुघल व पुन्हा मराठा आणि शेवटी इंग्रज ह्यांच्या राजवटी कडे या गडाचे हस्तांतर झाले. 

जाण्याचा मार्ग

                    पुण्याहून  - मुंबई -पुणे - बेंगलोर हायवेने पाचवड 

                   मुंबईहून -   मुंबई -पुणे - बेंगलोर हायवेने पाचवड 

                     

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

पांडवगड किल्ला

                                                              पांडवगड किल्ला


 पांडवगड किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. हा गड समुद्र सपाटीपासून साधारण पाने १२४३ मी उंचीवर आहे. हा गड वाई जवळ असून महाबळेश्वर डोंगररांगेत आहे. वाई च्या पूर्व भागाला वैराटगड असून पश्चिम भागाला पांडवगड आहे. पुण्यापासून हा किल्ला साधारणपणे ९१ कि.मी. असून मुंबई पासून साधारणपणे २३४ कि.मी. दूर आहे. 

ह्या गडावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत. मुंबई -पुणे हायवेने वाईला यावे व वाईवरून मेणवली गावात येऊन गडावर जात येते तर दुसरा वै वाईवरून वाई - मांढरदेवी मार्गाने धावडी गावात येऊन गडावर येता येईल. धावडी गावात आल्यावर पायथ्याशी गाडी लावून गडावर जातात. गडाची चढाईची सुरवात होते. गडावर जाताना एक घर लागते. हे घर  व  चढाईची जागा ही खाजगी मालकीची असून त्या परिसराची देखभाल करण्यासाठी काही मुले तेथे ठेवलेले आहेत. गडावर जाताना त्या घरात आपली नोंद म्हणजे नाव पत्ता गडावर जाणाऱ्यांची संख्या त्याची नोंद करावी लागते.गडावर जाताना आपल्याला पाण्याच्या टाक्या दृष्टीस पडतात. गडावर जाताना गवत खूप वाढलेले असते त्यामुळे त्याचे काटे आपल्याला टोचतात  साधारणपणे ४५ मिनिटाच्या चढाई नंतर आपण गडाच्या प्रवेशावर पोचतो,

ह्या गडाचे प्रवेशद्वार भग्न अवस्थेत आहे.  प्रवेशद्वार गडाच्या उत्तर बाजूस आहे  हा किल्लाची खूप पडझड झालेली आहे.   प्रवेशद्वार पासून पुढे गेल्यास वाटेत पाण्याच्या टाक्या, हनुमानाचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर गडाची देवी पांडवजाई देवीचे मंदिर आहे. ह्या देवीच्या नावावर गडाचे नाव पांडवगड पडले आहे. गडाचा कडा नसर्गिक कातळाने असल्यामुळे गडाला  फारशी तटबंदी नाही. गडावर शिवलींग व नंदी पांडवजाई देवीच्या मंदिर बाहेर आहे. हे शिवलिंग आणि नंदी हा पांडवजाई देवीच्या मंदिरा मागे असणाऱ्या महादेव मंदिर जे की भग्न अवस्थेत आहे. त्यातलेच असावे. ह्या गडावर चुन्याचा घाना आहे. 


गडमाथ्यावरून धोम धरणाचे जलाशय, कमळगड, महाबळेश्वर व पाचगणीचे पठार दिसते. वाई, कृष्णा नदी, केंजळगड, मांढरदेव, चंदन वंदन व  वैराटगड दिसतो 

हा किल्ला राजभोज याने इसवी सन ११७८ ते ११९३ या कालखंडात बांधला असल्याची नोंद आहे. पुढे हा किल्ला आदिलशाहीत गेला शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६५३ मध्ये जिंकून स्वराजात आणला पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर हा किल्ला मोगलांकडे गेला परंतु संभाजी राजेंचे पुत्र शाहू महाराजांनी हा किल्ला जिंकूला व पुढे १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. 

मुंबई पुण्याहून एसटी ने वाईला यावे व वै वरून बसची खाजगी वाहनांची सुविधा आहे. 

जाण्याचा मार्ग -   

  मुंबई हुन            मुंबई - वाई - मेणवली 

                           मुंबई - वाई - धावडी 

 पुण्याहून              पुणे - वाई - मेणवली 

                            पुणे - वाई - धावडी 

सोमवार, १३ एप्रिल, २०२०

मधुमकरंद गड

                              मधुमकरंद गड


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये मधुमकरंद गड. मधुमकरंद गड हा सातारा जिल्यातील एक गाद गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे ४०५० फूट उंचीवर असून प्रतापगडापासून साधारणपणे २७ कि.मी. तर महाबळेश्वर पासून ३७ कि.मी अंतरावर तर पुण्यापासून १५६ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे तर मुंबई पासून साधारणपणे २९० कि.मी. अंतरावर आहे. हा किल्ला जावळीच्या जंगलात आहे. मधुशिखर हे एक सातारा, रायगड व रत्नागिरी ह्या जिल्ह्याची सीमा आहे.
किल्ल्याच्या पायथ्याशी घोणसपूर गाव आहे व ह्या गावाच्या वरच्या बाजूनी गडावर जाण्यासाठी अरुंद अशी वाट आहे हि वाट घनदाट जंगलातून जाते. गडावर जाण्यासाठी साधारणपणे १ तास लागतो हा गाद दोन भागात आहे एक मधुशिखर आणि दुसरा मकरंदगड . गडाला जाताना नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या भोगोलिक बुरचनेचा उपयोग करण्यात आला उदा गडाचे प्रवेशद्वार नैसर्गिक रित्या तयार झालेल्या बुरुजात बनवलेले आहे. गडावर अनेक कातळात कोरलेले पाण्याचे तळ आहे. हे तळ फार प्राचीन काळी कोरलेली असावी. गडावर महादेवाचे मंदिर आहे. गडावर विशेष असे बांधकाम नाही. गडावरून अनेक गाद जसे प्रतापगड, वासोटा, रसाळगड, सुमारगड, माहिमनगड दिसतात ह्यामुळे हा किल्ला ह्या गडाचा एक दुवा असावा  तसेच कोयना धरणाचे शिवसागर जलाशय  व अभयारण्य दिसते. 
हा किल्ला शिवाजीमहाराजांनी १६५६ मध्ये प्रतापगडच्या बांधणीच्या वेळी बांधला हा गड पुढे १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. 
मार्ग - पुणे - महाबळेश्वर - घोणसगाव 
           मुंबई - महाबळेश्वर - घोणसगाव 

शुक्रवार, १० एप्रिल, २०२०

किल्ले भूषणगड

                          किल्ले भूषणगड 

 महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहितीमध्ये भूषणगड हा सातारा जिल्ह्यातील मन खटाव तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे हा समुद्रसपाटी पासून साधारणपणे २९७० फूट उंचीवर आहे. गडाच्या पायथ्याशी भूषणगड नावाचे छोटे से गाव आहे ह्या गावात येण्यासाठी चारी बाजूनी रस्ते आहेत. गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायर्यांवरून वर चढत असताना आपल्याला म्हसोबाचे मंदिर दिसते व त्या मंदिराच्या थोडे पुढे पायऱ्या चढत आल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वार पर्यंत पोचवतो. प्रवेशद्वाराची बांधणी हि गायमुखी पद्धतीची असून दरवाजाची कमान पडलेली आहे परंतु पहारिकऱ्यांसाठी असणारी देवड्या मात्र चांगल्या अवस्थेत आहे. ह्या दरवाज्याच्या सरळ वाटेने गेल्यास ती वाट आपल्याला गडाच्या पश्चिम कड्यावर नेते. व डावीकडील वाटेवर गेल्यास ती वाट आपल्याला गडाच्या माथ्यावर नेते. भूषणगड आकाराने छोटा आहे. गडाची तटबंदीची काही ठिकाणी पडझड झाली आहे. परुंतु बाकी तटबंदी सुअवेस्थेत आहे. गडाला अनेक बुरुज आहे. भूषणगडाचा आकार त्रिकोण असून तिन्ही कोन्याला बुरुज आहे. गडावर हरणामइ मातेचे मंदिर आहे. गडावरून औंधची यमाई, महिमानगड, शिखरशिंगणापूरही दृष्टीस पडतो.

भूषणगड हा आकाराने लहान असल्यामुळे त्याचा उपयोग टेहळणी साठी केला जात असावा व कोकण चिपळूण व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी एकला ताज असावा. हा गडाची बांधणी देवगिरीच्या शिंघान राजकर्ते सम्राट राजा शिंघान दुसरा याने केली. ह्या राजाचा कालखंड १२१० ते १२४७ असा आहे. पुढे हा किल्ला अदिलशाहीकडे गेला व पुढे तो स्वरजात आला इ.स. १६१७६ मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला व ह्याची फेरबांधणी केली पुढे हा गाद औरंगजेबाने जिंकलं व ह्याचे नांव इस्लामतर ठेवले पुढे तो पुन्हा स्वरजात आला. पुढे तो पेशवाई कडे गेला पुढे १८१८ रोजी हा गाद इंग्रजांकडे गेला 


मार्ग - सातारा, कराड, दहिवडी येथून वडूज वर येता येते. पुढे वडूज वरून ३० कि.मी. अंतरावर पळशी  गावात येता येते. पळशीवरून कच्च्या रस्त्याने आपण ५ कि.मी. अंतरावर भूषणगड गावात पोहचतो  
पुणे ते पळशी साधारणपणे १९० कि.मी. 
मुंबई ते पळशी साधारणपणे ३२० कि.मी. 

किल्ले भैरवगड

                            किल्ले भैरवगड

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये भैरवगड हा  सातारा जिल्ह्यातील  एक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३००० फूट उंचीवर आहे.  सह्याद्रीच्या पर्वत रांगेतल्या डोंगरात असून  किल्ला घनदाट दाट जंगलात वसलेला आहे. हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.  भैरवगडाच्या आजुबानूने अभयारण्याला 'टायगर रेसेर्वे ' घोषित केल्यामुळे हा संपूर्ण परिसर वनखात्याकडे असून हा गडावर जाण्यासाठी वन विभागाची लेखी परवानगी घ्यावी लागते.
भैरवगड साताऱ्याहून १६ कि.मी. व पुण्याहून १४० कि.मी. व मुंबईहून ८० कि.मी. अंतरावर असून गडावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. दुर्गवाडी मार्ग, गव्हारे मार्ग, व पातेमार्ग. भैरवगडाच्या किल्ल्याचा डोंगरवार पोहचल्यावर एक बांधीव बुरुज व तेथेच वरच्या बाजूस कातळात कोरलेली गुहा दिसते गुहेपासून थोडे पुढे डोंगरावर वळसा मारून पुढे दरीच्या बाजूला बुरुज व दक्षिणमुखी दरवाजा आहे हा दरवाजा भग्न अवस्थेत आहे गडाच्या दक्षिणमुखी दरवाजाचा टेकड्यावरून मागच्या बाजूस गेल्यास पाण्याचे दोन टाक्या दिसतात. हा गडावर वर पाहण्यासाठी फार काही नाही. हा किल्ल्याचा उपयोग टेहळणी साठी करत असावे. आता हा किल्ला त्याच्या भवताली असेलल्या अभयारण्य मुळे व जंगली प्राण्यांमुळे हा किल्ला टर्रेकेर्स साठी उपयुक्त आहे. सह्यादीपर्वताच्या कुशीत नानाप्रकारच्या वनस्पती, झाडी, किडे, व कीटक येथे पाहावयास मिळतात
मार्ग -
१) हेळवाकच्या रामघळ मार्ग चिपळूण कराड रस्त्यावर कुभाजी घातपात केल्यावर हेळवाक गाव आहे तेथून मेढघर मार्ग कोंढावले धनगरवाड्याला गेल्यावर रामघळ लागते. ये रामघळीतूनच वर जाणारा रथ भैरवगडावर पोहचतो.
२)गव्हारे मार्ग - दुर्गवाडी गाव अगोदर गव्हारे गावाकडे जाणारा रास्ता लागतो हा गावातून जाणाऱ्या वाटेने गडावर जाण्याचा मार्ग आहे.
३) पाटमार्ग  - चिपळूणवरून गोव्याच्या दिशेला जाताना २१ कि.मी. वर 'आसुडी फाटा ' लागतो. तेथून डावीकडे वळल्यास पाते गावात जाता येते. व गावातून गडावर जाण्यास पायऱ्या आहेत. 

मंगळवार, ७ एप्रिल, २०२०

किल्ले वंदनगड

किल्ले वंदनगड


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती किल्ले वंदनगड हा किल्ला सातारा जिल्यातील वाई तालुक्यात आहे. हा एक गिरिदुर्ग असूनसमुद्रसपाटी पासून ३८०० फूट उंचावर आहे.  साताऱ्या पासून साधारणपणे २५ कि.मी. अंतरावर तर पुण्यापासून साधारणपणे  ९० व मुंबईपासूनच्या २४० कि.मी अंतरावर हा किल्ला आहे. चंदन वंदन हि एक दुर्गजोडी असून हे किल्ले सह्याद्रीच्या महादेव ह्या उपरांगेवर स्थित आहे.
पुणे सातारा रोडवर भुईंज गाव पासून डावीकडे वळाल्यावर गडावर जाण्याचा मार्ग आहे . गडावर जाण्यासाठी दोन गर्ग आहे. एक इब्राहीमपूर गावाजवळून तर दुसरा बेलमाचीवरून. इब्राहीमपूर गावजळून दुधाणेवाडी वाहनाने जावे व पुढे १ कि.मी. ची चढाई केल्यास गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचता येते. हा सर्वात सोपा मार्ग आहे.गडाचे प्रवेशद्वार द्वार चांगल्या स्थितीत असून गडाच्या प्रवेशद्वारावर किर्तीचक्र व गणेशमूर्ती कोरलेली आहे. पुढे भोजकालीन दरवाजावर दोन   दुसरा मोडी लिपीमध्ये आहे. गडावर एक खंदक आहे. व पाच पाण्याचे तळे आहे. पुढे गेल्यास महादेवाचे छप्परी मंदिर आहे. गडाच्या मध्यभागी एक कोठार असून ते दारुगोळ्याची असावे. गडाचे बालेकिल्ला टेकडीवर असून त्याचे अवशेष आपल्यास पाहावयास मिळते. गडावर अनेक पडकी घराचे अवशेष दिसतात. तसेच चुन्याच्या घाणीचे अवशेष व गडाचा दक्षिणेस एक चोर द्वार आहे.

पुरातन तांब्रालेखानुसार हा किल्ला ११व्य शतकातील असून ह्या किल्ल्याची बांधणी शिलाहार वंशातील राजाभोजणे केली आहे. शिवाजी महारांजानी अफजलखानाच्या वधानंतर सातारा किल्ल्या जिंकल्यावर ह्या गडावर आक्रमण करून हे गड स्वराजात सामील करून घेतले व ह्या गडाचे णव शूरगाड नाव बदलून चंदनगड ठेवले. उचे संभाजी महारांच्या कारकिर्दीत १६८५ मध्ये अमातुल्य खानने ह्या गडावर हल्ला केला. पुढे १६८९ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पुढे तो मोगलांकडे गेला. पुढे १७०७ मध्ये हा किल्ला शाहू महाराजांनी पुन्हा स्वराज्यांत आणला पुढे हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मार्ग - सातारा   - भुईंज -इब्राहिमपूर - दुधांवाडी
          पुणे - सातारा - भुईंज- इब्राहीमपूर-दुगणवाडी 
          मुंबई - सातारा - भुईंज - इब्राहीमपूर- दुधांवाडी 

किल्ले चंदनगड

                              किल्ले चंदनगड



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती किल्ले चंदनगड हा किल्ला सातारा जिल्यातील कोरेगाव तालुक्यात आहे. हा एक गिरिदुर्ग असूनसमुद्रसपाटी पासून ३८०० फूट उंचावर आहे.  साताऱ्या पासून साधारणपणे २५ कि.मी. अंतरावर तर पुण्यापासून साधारणपणे  ९० व मुंबईपासूनच्या २४० कि.मी अंतरावर हा किल्ला आहे. चंदन वंदन हि एक दुर्गजोडी असून हे किल्ले सह्याद्रीच्या महादेव ह्या उपरांगेवर स्थित आहे.
पुणे सातारा रोडवर भुईंज गाव पासून डावीकडे वळाल्यावर गडावर जाण्याचा मार्ग आहे . गडावर जाण्यासाठी दोन गर्ग आहे. एक इब्राहीमपूर गावाजवळून तर दुसरा बेलमाचीवरून. इब्राहीमपूर गावजळून दुधाणेवाडी वाहनाने जावे व पुढे १ कि.मी. ची चढाई केल्यास गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहचता येते. हा सर्वात सोपा मार्ग आहे.
गडाचे प्रवेश द्वार हे पडक्या अवस्थेत असून गडावर महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर शिवाजीमहाराजांनी बांधले आहे गडावर राजा बांधलेली दोन दगडी मिनार आहे. चांगडासाब्या पायथ्याशी मध्यभागी एक दगडी चौथरा आहे. दारुगोळा कोठार असून ह्या कोठाराच्या भिंडीतला छप्पर नाही. गडावर के विहीर आहे.
पुरातन तांब्रालेखानुसार हा किल्ला ११व्य शतकातील असून ह्या किल्ल्याची बांधणी शिलाहार वंशातील राजाभोजणे केली आहे. शिवाजी महारांजानी अफजलखानाच्या वधानंतर सातारा किल्ल्या जिंकल्यावर ह्या गडावर आक्रमण करून हे गड स्वराजात सामील करून घेतले व ह्या गडाचे णव शूरगाड नाव बदलून चंदनगड ठेवले. उचे संभाजी महारांच्या कारकिर्दीत १६८५ मध्ये अमातुल्य खानने ह्या गडावर हल्ला केला. पुढे १६८९ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पुढे तो मोगलांकडे गेला. पुढे १७०७ मध्ये हा किल्ला शाहू महाराजांनी पुन्हा स्वराज्यांत आणला पुढे हा किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.








मार्ग - सातारा   - भुईंज -इबरहीमपूर-दुधांवाडी
           पुणे - सातारा   - भुईंज -इबरहीमपूर-दुधांवाडी
          मुंबई -सातारा   - भुईंज -इबरहीमपूर-दुधांवाडी

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

किल्ले महिमानगड

                        किल्ले महिमानगड 
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती किल्ले महिमानगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटी पासून साधारणपणे ३२००  उंचीवर हा किल्ला आहे. सातारा - फलटण डोंगररांगेतजील हा एक किल्ला आहे. हा किल्ला साताराहुन ५० कि.मी. अंतरावर तर पुण्याहून साधारणपणे १६५ कि.मी अंतरावर तर मुंबई पासून साधारणपणे ३१० कि.मी अंतरावर हा  किल्ला आहे. महिमान गावाच्या दक्षिण पायथ्याशी महिमान गाद वाडी आहे. व उकिरडकडूनहि गडाला जायचा मार्ग आहे. हा मार्ग थोडा अवघड आहे. महिमान गडाच्या फाट्यापासून गडाचा पायथा असलेल्या गाव पर्यंत गाडीने जात येते. महिमानगड वाडी उतारावर  वसलेली आहे. वाडीतील मंदिरपासून गडावर जायला एक वाट आहे. बया वाटेवरूनच गडाच्या दरवाजचे बुरुज दिसतात. या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत पाण्याची टाकी कोरलेली आहे. पुढे गडात शिरणारा मार्ग दिसतो इथल्या तटबंदी वर अनेक झाडे उगवली दिसतात त्यामुळे दरवाजाची कामं ढासळून नष्ट झाली आहे. फक्त कमानीचे उभे खांब शिल्लक आहेत. या दगडांच्या खांबावर सुरेख हत्ती कोरलेले आहे. दरवाजाची बांधणी गोमुख पध्द्तीची आहे. दरवाजातून आत प्रवेश केल्यास डावीकडील वाट गडाच्या मान्यवर जाते. तटबंदीला अनेक बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पूर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. व त्या टोकावर टेहळणीसाठी एक बुरुज आहे. या तटबंदीला दोन दिंडी दरवाजे आहेत गडाच्या  मथयवरून भूषणगड, वर्धनगड हे किल्ले दिसतात व मोळघाट परिसर दिसतो. 


ह्या किल्ल्याचा उपयोग साताऱ्याच्या पूर्वकडील प्रांताचे संरक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी जे केले घेतले व बांधले त्या किल्ल्या पैकी एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरिता महार रामोशी मिळून ७५ इसम गडावर ठेवले होते. किल्ल्याचा हवालदार पाहणी सबनीस यायची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुलकर्णी यांच्याकडे चालू आहे. 
                                      
मार्ग - साताऱ्याहून माहिमगड ५० कि. मी. असून  सातारा पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुचे १२ कि.मी. अंतरावर असणाऱ्या महिमानगड फाट्यापासून पुढे जातो. दहिवडी कडून साताऱ्याकडे येणाऱ्या रस्त्यावरून सुद्धा महिमानगड फाट्यावर उतरता येते. महिमानगड फाट्यावरून महिमानगड गावात २० मिनिट लागतात.    

किल्ले वर्धनगड

                             किल्ले वर्धनगड 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये वर्धमान हा किल्ला सातारा जिल्यातील फलटण तालुक्यातील आहे. हा एक गिरिदुर्ग आहे. हा समुद्रसपाटीपासून १५०० फूट उंचीवर आहे. सह्याद्रीची एक रांग माण देशातून जाते ते महादेव डोंगररांग आहे. ह्या डोंगररांगेवर स्थित आहे. वर्धनगाव हे किल्ल्याच्या पायथ्याशी  आहे. पुणे ते वर्धनगड हे १३२ कि.मी. आहे. तर मुंबई ते वर्धनगड साधारणपणे २७३ कि.मी आहे वर्धनगड गावातून किल्ल्याची तटबंदी दिसते गावातून किल्ल्यावर  प्रशस्थ वाट आहे. हि वाट गडाच्या पायथ्याशी जाते गडाच्या प्रवेशद्वाराची गोमुखी बांधणी आहे. किल्ल्याची पूर्ण तटबंधी सुस्थितीत आहे. दरवाजाच्या आत गेल्यास डावीकडे एक ध्वजसंभ आहे व पुढे गेल्यावर एक चोर वाट  आपल्याला गडाच्या तटाबाहेर घेऊन जाते. दरवाजाच्या पुढेच पायऱ्या दिसतात ते चढून वर जाताना त्या टेकडावरती होण्याची भग्न मूर्ती  आहे पुढे महादेवाचे मंदिर आहे. व मंदिराशेजारीच पाण्याचे टाके आहे. टेकडावर वर्धनीमातेचे मंदिर आहे मंदिराच्या मागच्या बाजूने टेकडावरून एक वाट खाली उतरली या वाटेने उतरताना उजवीकडे  आढळतात

हा गडाच्या इतिहासानुसार हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये बांधावयास सुरवात झाली. व ह्या गडाचे काम १६७४ रोजी पूर्ण झाले. ५ मे १७०१ या दिवशी मोघलानी पन्हाळा जिंकल्यावर औरंजेबाने  पुढचे लक्ष सातारा होते त्यासाठी त्याने मोघल सरदार फत्तेउल्लाखानची ह्या कामगिरी साठी नेमणूक केली तेव्हा वर्धमानगडावर हा मोघल सरदार हल्ला करेल ह्या पूर्ण कल्पना किल्लेदारास होती व त्या बाबतीत ची तयारी किल्लेदारणाने सुरु केली त्याने किल्ल्याच्या  पायथ्यालगतचे गाव व वाड्या खाली करून घेतला मोघलच्या सरदाराने जसे खटावचे ठाणे जिंकले त्याने वर्धनगडावर चाल करण्याचे नियोजन केले ह्याची कल्पना किल्लेदारास आली व तेव्हा वेळखाऊपणा करण्यासाठी त्याने मुघल सरदाराकडे एक वकील पाठवला  व त्यास जर किल्लेदाराच्या प्राणाचे अभय दिल्यास किल्लेदार किल्ला मोघलांना देण्यास तयार होईल असे सांगितले. मुघल दाणेदार किलदाराची वाट बाहेत राहिला परुंतु त्याला किलदाराच्या युक्तीची  कल्पना आली व त्याने वर्धनगडावर हल्ला केला. मुघल व मराठे यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले व शेवटी मोघलांनी हा गड जिंकलं व गडाचे नांव बदलून सादिकगड ठेवले  परंतु औरंजेबाची पाठ फिरतातच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला व त्याचे नाव सादिकगड बदलून वर्धनगड केले.



 मार्ग -  सातारा - वर्धनगड ५७ कि.मी.
           पुणे - सातारा- वर्धनगड  १३२ कि.मी.
          मुंबई  - सातारा - वर्धनगड २७३ कि.मी. 

किल्ले संतोषगड

                             किल्ले संतोषगड 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये संतोषगड हा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला पुण्यापासून १६० कि. मी. असून मुंबईपासून ३१० कि.मी. आहे. हा किल्ला समुद्रसपाटी पासून साधारणपणे २९०० फूट उंचीवर आहे.  किल्ल्याच्या पायथ्याशी ताथवडे गाव आहे. त्यामुळे त्या ताथवडेचा किल्ला असे म्हणतात. सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागामध्ये विभागलेली आहे. शंभू महादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग या पैकी म्हसोबा डोंगर रांगेवर हा किल्ला आहे. साताऱ्यापासून ५५ ते ६० कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे. हा किल्ला आकाराने छोटा आहे हा किल्ल्याचा उपयोग फलटण भागावर टेहळणी साठी केला जातो.
                                                       
ताथवडे  पायथ्यावरील गाव असून त्या गावात एक मंदिर आहे. त्या मंदिरावरून असे समजते कि किल्ला १६६२ मध्ये शिवाजी महाराजांनी बांधला आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर एक मठ आहे व मठाच्या बाजूला एक गुहा असून त्यात वाल्मिकी ऋषींची मूर्ती आहे पुढे किल्ल्याच्या दरवाजा  किल्ल्याचा दरवाजाची पडझड झाली असून पहारेकऱ्यांच्या देवड्या मात्र शिल्लक राहिले आहेत दरवाजाच्या पुढे गेल्यावर मात्र हनुमानाचे टाक आहे व पुढे गेल्यावर वाड्याचे व घराचे अवशेष आहेत. व पुढे धान्याचे कोठार आहे. ह्या धान्याच्या कोठाराच्या फक्त भिंती उभ्या राहिले आहे. पुढे गेल्यास पाण्याचे टाक असून टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळ भिंडीला भोक पाडून पायऱ्या केल्या आहेत. किल्ल्याची तटबंदी सुस्थितीत आहे. गडाच्या वाट महाद्वाराच्या कमानी पडक्या विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्याना पायबंद बसावा यासाठी ह्या गडाची उभारणी केली. 


हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६६६ साली बांधला असून तो  नाईक निबाळकर याच्याकडे किल्ल्याची सूत्रे हाती दिली. परंतु त्याच वर्षी पुरंदरच्या तहात हा गड मोगलांकडे गेला परंतु  राजकर्त्याने हा गड त्याच्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांनी हा गड त्याच्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६७३ मध्ये मुघलांनी पुन्हा हा गड जिंकलं. पुन्हा हा किल्ला १७२० रोजी शाहू महाराजांच्या हाती दिला. पुढे १८१८ साली हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा इंग्रजांनी ह्या गडाची भरपूर नासधूस केली  गेली. 
                                
मार्ग - किल्ल्यावर जाण्यसासाठी फलटण व सातारा दोन्ही शहरातून जात येते. 
ताथवडे - ताथवडेला अनेक मार्गानी पोहचला येते फलटण ते ताथवडे अशी एस. टी हे अंतर १९ कि.मी. आहे. 
सातारा - साताऱ्याहून पुसेगाव साधारणपणे २३ कि.मी. आहे. मोळघाट मार्ग फलटणला जाणाऱ्या बसने ताथवडेला उतरता येते.                

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

किल्ले सज्जनगड

                          किल्ले सज्जनगड

 महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये सज्जनगड किल्ला सातारा जिल्यातील परळी तालुक्यातील  असून  हा एक गिरिदुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणपणे ३३५० फूट उंचीवर आहे अस्वलायन ऋषींचे हा डोंगरावर वास्तवाचे स्थान होते म्हणून त्यास अस्वलयानगड म्हणतात.  पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव  नावाने पूर्वीकडे जाते बया रांगेला तीन फाटे फुटतात त्यापैकी रांगेवर सज्जनगड हा किल्ला आहे. किल्ल्याचा आकार हा एक शंखाकृती आहे.  पुण्य पासून परळी १२५ कि.मी. व मुंबई पासून २६६ कि.मी आहे.
ह्या किल्ल्याला दोन दरवाजे आहे एक छत्रपती  महाराज द्वार व दुसरे समर्थ द्वार . ह्या किल्ल्यावर रामदास स्वामी यांची समाधी आहे. किल्ल्यावर मारुतीचे व गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या दरवाजात मारुती व वराहची मूर्ती आहे प्रवेश द्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर असून मंदिरा लगत अशोकवन वेणाबाई वृदावन, ओवऱ्या, अक्काबाईचे वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. राममंदिर व मठ यांच्या दरम्यान असलेल्या दरवाजायने पश्चिमेस गेल्यास उजव्या हातास एक चौथरा आहे व  शेकरु फासलेला गोटा आहे त्यास ब्रम्हपिसा म्हणतात. गडाच्या पश्चिमेच्या टोकावर मारुती मंदिर अशे त्याला धाब्याचा मारुती असे म्हणतात. तसेच गडावर गावमारुती व कल्याण स्वामींचे मंदिर आहे. तसेच रामघळ हुह आहे. सज्जनगडाच्या पायथाशी परळी गावंलागेतच केदारेश्वर व विरुपाक्ष अशी दोन प्राचीन मंदिर आहेत व कुसगावापासून जवळच मोरगळ नावाची गुहा आहे.
                             
ह्या किल्ल्याची उभारणी ११ व्या शतकातील असून शिलाहार वंशातील राजभोज राजाने केले गेली असा इतिहास आहे. पुढे १६७३ मध्ये शिवरायांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकला व त्याचा समावेश स्वराजात केला. इ.स. १६८२ मध्ये रामदास स्वामींनी ह्या गडावर देह ठेवला पुढे २१ एप्रिल ए.स. १७०० मध्ये फत्तेउल्लखाने सज्जनगडास वेढा घातला व ६ जून १७०० मध्ये ताब्यात घेतला व  त्याचे नाव नवरसातारा ठेवले. परंतु १७०९ रोजी मराठयानी हा गड पुन्हा जिंकला व इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
 मार्ग - ह्या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) परळीपासून -  साताऱ्यापासून ते परळी अंतर १० कि.मी. चे आहे. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
२) गजवडीपासून - साताऱ्यापासून गजवाडी ७ कि.मी आउंटावर तेथून थेट गडाच्या कातळ मोथ्या पर्यांतगाडीने जात येते
साताऱ्यापासून एस. टी ने  परळी पर्यंत व गाजवादी पर्यंत येता येते.

गुरुवार, २ एप्रिल, २०२०

वसोटा किल्ला (व्याघ्रगड )


                     वसोटा किल्ला (व्याघ्रगड )



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये  वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात असून हा किल्ला वनदुर्ग प्रकारात मोडतो परंतु हा किल्ला जास्त उंचीवर असल्याकारणाने ह्या किल्ल्याला गिरिदुर्ग ही  म्हणतात. हा किल्ला समुद्रसपाटी पासून ४२६७ फूट उंचीवर आहे.हा किल्ला पुण्यापासून २२६ कि,मी. दूर असून मुंबई पासून २६२ कि.मी. दूर आहे. हा किल्ला जावळीच्या जंगलामध्ये आहे. सह्याद्रीची मुख्य रांग हि दक्षिणउत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी घेरा दतगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वर पासून दातेगडापर्यंत जाते या दोन रांगा मधून कोयना नदी वाहते. जावळीच्या खोऱ्या मधून वाहण्याऱ्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात
                              
ह्या गडावर जाण्यासाठी सातारा ते कास पठार व कास पठार ते बामणोली गाव असा आहे. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाजवळ वसलेले आहे. ह्या गावाजवळ बोटी उपलब्ध आहेत. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी ग्रुप बरोबरच जावे लागते. वासोटावर जाण्यासाठी बोटीचे बुकिंग व वनविभागाची परवानगी लागते. शिवसागर जलाशयातून साधारणपणे १ तास बोटीचा प्रवास करावा लागतो. बोटीने जाताना कोयना नदी, कांदेर नदी व सोशी नदी ह्या नद्यांचा संगम पाहावयास मिळतो. पुढे आपण वासोट्याच्या पायथ्याशी असणारे मेट इंदवली गावाजवळ पोहचतो या पुढे ४ कि. मी. जंगलातून प्रवास असतो. जंगलात प्रवेश करण्याआधी तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक वस्तूची मोजणी केली असते. विशेष करून प्लास्टिक कारण आपल्याकडून कोणतेही प्लास्टिक किंवा इतर वस्तू येथे राहिल्यास त्याचा दुष्परिणाम जंगलातील प्राण्यावर होऊ शकतो. ह्या जंगलात अनके रानटी प्राणी आहेत. वाघ, बिबट्या अस्वल या सारखे अनेक प्राणी आहेत. जंगलातून जाताना अनेक पाण्याचे झरे लागतात. किल्ल्यावर जाताना बिस्कीट घ्यावे.
किल्ल्यावर गेल्यावर किल्ल्याचा प्रवेशद्वार पडक्या अवस्थेत आहे व पुढेच हनुमानाची मूर्ती आहे. किल्ल्यावर अनेक वाड्याचे अवशेष आहेत चुन्याचा घाना, पाण्याच्या टाक्या दिसतात. ह्या किल्ल्याच्या बाबू कड्यावरून जुना वासोटा किल्ला दिसतो त्या किल्ल्या कडे जाण्यासाठी जॉन्टी वाट नसल्या कारणाने व जंगली प्राणी असल्यामुळे त्या गडावर कोणीही जात नाही. महादेवाचे मंदिराची डागडुगी केलेली दिसते. किल्ल्यावर एक माची आहे त्याला कालकाईचे ठाण म्हणतात. गडावरून नागेश्वरची गुहा दिसते. किल्ल्यापासून बोटीपर्यंत सूर्यास्तापर्यंत जावे कारण जलाशयातून सूर्यास्त पाहणे एक अविस्मरणीय क्षण असतो.
हा किल्ला शिलाहार कालीन असून ह्या गडाची बांधणी शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली. शिवाजी महाराजांनीं जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले जिंकले पण वासोटा दूर असल्याकारणाने हा किल्ला घेतला नाही पुढे शिवाजी महाराज पन्हाळ किल्ल्यावर अडकले असताना आपल्या मुख्यत्यारित मावळातील पायदळ पाठवून त्यांनी अवोस किल्ला ६ जून १६६० साली जिंकला व गडाला व्याघ्रगड असे नाव ठेवले. ह्या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात. याचे कारण निर्जन व घनदाट असे अरण्य व ह्या जंगलात वाघ व बिबट्या या सारखे अनेक प्राणी होते. आणि अजूनही आहेत
                             

मार्ग - वासोट्याला जाण्यासाठी प्रमुख दोन मार्ग आहेत
           १) कोकण - चिपळूण कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे  गावापर्यंत गाडीमार्ग असून या                 मार्गावर एस. टी बसच्या गाड्या आहेत चोरवणे पासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे                      येता येते.

           २) सातारा-कास पठार - बामणेली हा मार्ग जास्त सोयीचा आहे हा गाडीमार्ग असून यावर एस. टी बसेस                 आहे.
              

बुधवार, १ एप्रिल, २०२०

किल्ले दातेगड ( सुंदरगड )

                     किल्ले दातेगड ( सुंदरगड ) 



महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये दातेगड हा सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील किल्ला ऑन हा एक गिरिदुर्ग आहे. समुद्रसपाटी पासून साधारणपणे १०२७ फूट उंचीवर आहे. हा किल्ला बामणोली डोंगररांगेत आहे. या गडाची तटबंदी नैसर्गिक काळ्या कातळाची असून गडावर जेवढ्या वास्तू आहेत त्या पाषाणात कोरलेल्या आहे. दातेगड हा सातारा शहरापासून साधारणपणे ७५ कि..मी आहे. तर पाटण पासून १५ कि.मी. आहे. पुण्यापासून साधारणपणे १९० कि.मी. आहे. तर मुबईपासून ३३० कि . मी.
गड्याच्या पायथ्याशी टोळेवाडी असून टोळेवाडी पार   केल्यानतंर पायर्यांच्या वाटेने गडावर पोहचता येते. हा गड ५ एकर मध्ये विस्तारलेला आहे. गडाचे प्रवेशद्वार भग्न अवस्थेत आहे. असे म्हणतात हा दरवाजा १९६७ च्या कोयना भूकंपात कोसळला आहे. या पश्चिम तटावरील भग्न दरवाजा शेजारी ६ फूट उंच असेल गणपंतीची मूर्ती आहे. तेथून थोडे पुढे गेल्यास खडकात खोदलेली विहीर आहे. व त्याच विहिरीमध्ये तळाशी महादेवाचे खडकात कोरलेले मंदिर आहे. या मंदिरात शिवलींग या नक्षीदार नंदी हाये. गडाच्या एका बाजूची तटबंदी अजून चांगल्या अस्वस्थेत आहे. पहारेकरांसाठी देवड्या, धान्य कोठार, वाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात.
                                              
दातेगडाचा फारसा इतिहास उपलब्ध नसून ह्याच्या कोरीव कामानुसार तो प्राचीन असावा. मध्य युगामध्ये चिपळूण, पाटण, विजापूर,विजयनगर हा मार्गावर बांधलेल्या गडांपैकी एक .  शिवाजी महाराजांच्या काळात दातेगडास सुंदरगड असे नाव होते. त्यात शिवाजी महाराज स्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती या शिवबंदी करिता गडाशेजारी गावातील जागा नेमून देण्यात आल्या होत्या पाटणकर हे देशमुख म्हणून स्वराजाचे काम पाहत. व या किल्ल्याचे अधिपत्य सुद्धा त्यांच्याकडे होते. शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला महालांच्या अधिपत्या खाली गेला व १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात न लढताच गेला

मार्ग - सातारा - पाटण - टोळेवाडी
          पुणे - सातारा - पाटण - टोळेवाडी
          मुंबई - सातारा -पाटण - टोळेवाडी    

किल्ले गुणवंतगड (मोरगिरी किल्ला )

                 किल्ले गुणवंतगड (मोरगिरी किल्ला )                            

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये किल्ले गुणवंत  हा सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील असून हा एक गिरिदुर्ग असून समुद्र सपाटी पासून १००० फूट उंचीवर आहे. गडाच्या पायथ्याशी मोरगिरी गाव असल्यामुळे ह्याला मोरगिरीचा किल्ला असे म्हणत असावेत. पुण्याहून हा किल्ला साधारण पणे १८४ कि.मी. अंतरावर असून मुंबई पासून हा किल्ला ३२६ कि.मी अंतरावर आहे. हा किल्ला बामणोली डोंगरावर आहे. सातारा जिल्ह्याच्या पाटण गावापासून साधारणपणे १० कि.मी. अंतरावर हा गड आहे. ह्या किल्ल्याच्या शेजारीच दातेगड आहे व ह्या दोन्ही गडमधून कोयना नदी आणि हेळवाक - पाटण रस्त्या जातो हा किल्ला भग्न अवस्थेत गडावर किल्ल्याची तटबंदी  दिसत नाही. व ह्या  इतिहास हि  उपलब्ध नाही या गडावर फक्त एक विहीर आहे.व ३ ते ४ पाण्याचे टाक आहे. ह्या गडाचा वापर टेहळणी साठी किंवा सैन्यतळ म्हणून उपयोग केला जात असावा. हा किल्ला इ. स. १८१८ ला पेशवाई चा पाडाव इंग्रजांनी केला तेव्हा हा गड इंग्रजनाच्या ताब्यात गेला. 
मार्ग - गुणवंत गड पाटण असून ३ ते ४ कि. अंतरावर 
          पुणे ते पाटण १७४. कि.मी. पाटण ते मोरगाव १० कि.मी. 
          मुंबई ते पाटण ३१६ कमी  पाटण ते मोरगाव १० कि.मी. 

किल्ले अजिंक्यतारा

                          किल्ले अजिंक्यतारा
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये  अजिंक्यतारा हा गाद सातारा जिल्ह्यातील सातारा शहरात असून सातारा शहरापासून ३ कि. मी. अंतरावर आहे. पुण्याहून साधारणपणे ११८ कि. मी. तर मुंबईहून २५९ कि.मी. अंतरावर आहे. हा एक गिरिदुर्ग असून समुद्रसपाटीपासून साधारणपणे ४४०० फूट उंचीवर अशे हा किल्ला बामणोली डोंगररांगेत आहे हा किल्ल्या सातारा शहरात असल्याने सातारा एस. टी स्थनांकापासून अदालतवाड्या मार्गे जाण्याऱ्या कोणत्याही  अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जातात येते. व तसेच सातारा - राजवाडा अशी बससेवा दर १०-१५ मिनिटाला उपलब्ध आहे. राजवाडा बसस्थानका पासून अदालत विद्यापर्यत चाल जावे लागेल अदालत वाड्यापासून साधारणपणे १ कि.मी. चालत गेल्यास गडाच्या दरवाजापाशी पोहचतो.

गडावर प्रवेश केलेल्या मार्गावर दोन दरवाजे आहेत. व दोन वुरूज दृष्टीस पडतात. दरवाज्यातून आत गेल्यावर हनुमानाचे मंदिर आहे व थोडे पुणे गेल्यावर महादेवाचे मंदिर आहे. गडावर प्रसारभारती चे कार्यालय आहे व मागे पँझरबार्टीचे टॉवर आहे. थोडे पुढे गेल्यावर मंगळादेवीचे मंदिर व मंदिरापुढचं मंगळा बुरुज आहे. गडाच्या तटबंदीवरून फिरत येते गडाच्या दुसऱ्या बाजूस सुद्धा दोन दरवाजे आहेत. त्या दरवाज्या जवळच पाण्याचे नवीन तलाव आहेत परंतु त्यांना उन्हाळ्यात पाणी नसते.
गडावरून यव्तेश्वरचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.
ह्या गडाचा इतिहास पहिला तर सातारा किल्ला उर्फ अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी होय. हा कोलला शिलाहार वंशातील दुसऱ्या भोज राजाने इ.स. ११८० मध्ये बांधला पुजेधे हा किल्ला बहमनी सत्तेत व पुढे विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इ. १५८० पहिल्या आदिलशाही पत्नी चाँदबिबी येथे कैदेत होती. १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजीमहाराजांनी जिंकून स्वराजात सामील केला शिवाजीराजांच्या मृत्यू नंतर हा किल्लाला औरंगज़ेबाने वेढा दिला व १७०० मध्ये तब्ब्ल ४ महिनेच्या लढ्यानंतर हा किल्ला दुघलाईनच्या ताब्यात गेला व ह्या किल्ल्याचे नाव जम्तर ठेवले. पुढे ताराराणी सैन्याने हा किल्ला पुढे जिंकलं व त्याचे नाव पुन्हा अजिंक्यतारा ठेवले. पुढे हा किल्ला पुन्हा मुघलच्या ताब्यात गेला तेव्हा शाहू महाराजांनी पुन्हा हा किल्ला घेतला व १७०८ रोजी त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक केला.  या गडावरून कारभार पाहताना छत्रपती शाहूंनी सातारा शहराची स्थापना केली. पुढे मात्र १८१८ रोजी हा किल्ल्या इंग्रजांच्या ताब्यात गेला
मार्ग - पुणे- सातारा  एस टी किंवा खाजगी वाहनाने
         मुंबई - सातारा  एस टी किंवा खाजगी वाहनाने
  

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

कमळगड ( कातळगड )


                        कमळगड ( कातळगड )


महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये कमळगड उर्फ कातळगड हा गड साताऱ्या जिल्हातील वाई तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग असून समुद्रसपाटी पासून साधारणपणे ४२०० फिट उंचीवर आहे. हा किल्ला पुण्यापासून ११९ कि.मी. असून मुंबईहून २६० कि.मी आहे. हा किल्ला धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूस पुढे आलेल्या एका डोंगर रांगेवर आहे. ह्या डोंगरयाच्या दोन्ही बाजूनी पाण्याचा वेडा आहे. दक्षिण बाजूस कृष्णा नदीचे खोरे तर उत्तर बाजूस वाळकी नदीचे खोरे आहे.
                               
तुपेवाडी हि गडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावांपैकी एक. हे गाव ३०कि.मी वाई वरून तर ४६ कि.मी भोरवरून गडावर चढाईचा मार्ग तुपेवाडी दक्षिण बाजूने चालू होतो हा मार्गे सोपा व सुरक्षित आहे. हा मार्ग दोन्ही बाजूने झाडाने वेढलेला आहे. हा मार्ग आपल्याला कमलमाची पर्यंत पोहचवतो. ह्या माचीवर जांभूळाच्या झाडी आहेत. वरती एक लोणगाव आहे. ते गावकरी आपल्या राहण्याची व जेवण्याची सोय कमी दरामध्ये करतात. येथून २० मिनिटातच गडाच्या बालेकिल्ल्यावर पोचतो. बालेकिल्ला सभोवती असलेल्या जंगलपेक्षा ३० ते ४० फूट उंचीवर आहे. हा गड ३-४ एकर पठारावर पसरलेला आहे गडावर कोणतेही वास्तू नाही कोणता बुरुज किंवा महाल आणि दरवाजा सुद्धा नाही उंच व खोल दगडच या गडाचे तटबंदी आहे.
                              
गडाला जोडून येणारी एक डोंगर रांग लक्ष वेधून घेते. त्याला नवरा नवरी चे डोंगर म्हणतात. पुढे ४०-५० फूट रुंद भुयार आहे. व त्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहे. तिला गेरूची अंडी कवीची विहीर म्हणतात ह्या विहिरीच्या ५०- ५५ पायऱ्या उतरल्यावर तळाशी पोहचतो तळाच्या चोहूबाजूस खोल कपारी असून सर्वत्र गेरू आणि काव याची ओलसर माती आहे हे सोडल्यास गडावर कोणतेही अजून टाक  नाही
गडावरून केंजळगड, रायरेश्वराचे पठार, काळेश्वराचे पठार, पाचगणी, धोम धरण दृष्टीस पडते.
मार्ग - 
महाबळेश्वरहुन केट्स पॉईंटवरून खाली येणाऱ्या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खोऱ्यात उतरते कि सुमारे दोन तासात समोरच्या डोंगरउतारावरील नांदवणे गावी पोहचता येते व त्या वस्तीवरून दोन अडीच तासात कमळगडावर पोहचतो.
वाई - वाईहून नंदवणे गावी येण्यास एस. टी आहे
पुणे - पुणे ते वाई ९० कि. मी. व वाई वरून नांदवणे गाव
मुंबई - मुंबई तेवाई २३० कि. मी. व वाई वरून नंदवणे गाव  

किल्ले केंजळगड

                            किल्ले केंजळगड

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये केंजळ्गड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असून हा एक गिरिदुर्ग असून त्यांची उंची ४२६९ फीट आहे. केंजळगड हा कृष्णा व नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील एक डोंगरवार आहे त्याला महादे डोंगररांग हि म्हणतात. ह्या गडाच्या एक बाजूला धोम येथे कृष्णा धरण तर दुसरा बाजूला नीरा नदीवर देवघर धरण व जवळच रायरेश्वर, रोहिडा, कमळगड हे किल्ले दिसतात. ह्या किल्ल्याचे पठार लहान आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार पडलेल्या अवस्थेत असून इंग्रजांनी ह्या किल्ल्याची भरपूर नासधूस केली आहे. गडावर केंजळादेवीचे मंदिराचे अवशेष आहे. व  दोन चुनाभट्टी आहेत. व गडावर ३ मोठया व ६ लहान पाण्याच्या टाक्या आहेत.


इतिहासानुसार हा किल्ला पन्हाळच्या भोज राजाने १२शतकात बांधला पुढे तो १६४८ साली बिजापूरचा आदिलशाहने जिंकला. छत्रपती शिवाजीराजांनी वाई व भोर भागातील बहुतेक किल्ले जिंकले परंतु हा किल्ला खूप काळ स्वराजात नव्हता. पुढे १६९४ रोजी चिपळूणच्या मोहिमेच्या वेळेला हा किल्ला जिंकला पुढे १७०१ रोजी औरंगज़ेब याने हा गड जिंकला. १७०२ लाच हा गाद मराठ्यांनी हा गड पुन्हा स्वराजात आणला पुढे १८१८ ला जेव्हा पेशवचा पाडाव झाला तेव्हा हा गड सुद्धा जिंकला.


हा किल्ल्या वाई वरून २५ कि.मी. रस्त्याने आहे. तर भोरवरून रस्त्याने १७ कि.मी. आहे ह्या गडावर जवळील मार्ग हा पायथ्यशी असणाऱ्या घेरा केंजळ या पासून अर्धा ते एक तासात या गडावर पोचवतो ह्या गडावर तिन्ही ऋतूमध्ये जात येते.
मार्ग - मुंबई -सातारा -कोल्हापूर महामार्गावरून साताऱ्याच्या वाई व वाई च्या पुढे १८-२० कि.मी अंतरावर एस ती ने जीप ने किंवा खाजगी गाडीने खावली या गावातून केंजळगडास जाण्याचा मार्ग आहे. महाराष्ट्र सरकारने गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाण्यासाठी रस्ता बनवला आहे. 

किल्ले हडसर (पर्वतगड)

                        किल्ले हडसर (पर्वतगड)

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये हडसर किल्ला उर्फ पर्वतगड  पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून समुद्रसपाटी पासून ४६८० फीट आहे. पुण्यापासून साधारणपणे १०५ कि.मी. असून मुंबई पासून १५६ कि.मी आहे हडसर हे या गडाच्या पायथ्याशी असणारे गाव आहे. जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवडा यापैकी कोणतीही बस पकडून तासाभरात हडसर या गावी जात येते. हडसर गावातून डोंगरापर्यंत जाताना लागलेला पठारावरून ह्या किल्ल्याची तटबंदी दिसते साधारणपणे अर्धा तास चालून गेल्यावर बुरुजापर्यंत पोहचता येते व थोडी चढाई करून किल्ल्याच्या द्वारा पर्यंत पोचता येते. व थोडी चढाई करून किल्याच्या द्वारापर्यंत जाताना डोंगरकरपर्यंत कोरलेल्या दोन टाक दिसते पुढे वळण घेऊन १०० पायऱ्याचढून खिंडीच्या मुख्य दरवाजापाशी पोहचता येते. हि राजदरवाजाची वाट आहे. हा दरवाजा बोगदे वजा प्रवेशमार्गावरची उत्कृष्ट नमुना दरवाजाची दुक्कल नलोन खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वार आहें. गडावरील मुख्य दरवाजातून दोन वाटत फुटत. एक वाट तोडावेत जाते तर दुसरी प्रवेश द्वाराकडे जाते. दुसऱ्या दरवाजातून वरती आल्यावर पाण्याचे एक ताई आहे. त्याच्या डावीकडे वळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्थ कोठारे दिसतात. त्याच्या बांधकामावर गणेश प्रतिमा कोरलेल्या हायेत तेथून उजवीकडे वळल्यास मोठा तलाव लागतो व पुढे महादेवाचे मंदिर हि लागते मंदिराच्या समोरच भक्कम बुरुज आहे व एक तलाव आहे व तेथून पुढे गेल्यास खडकात कोरलेली प्रशस्थ गुहा आहे
ह्या गडावरून माणिकडोह जलाशयाचा परिसर, चावंड, नाणेघाट, शिवनेरी, भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो.
 
हा किल्ला सातवाहन कालीन असून असून नाणे घाटाच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला आहे. नाणे घाट हा पूर्वीचा व्यापारी मार्ग होता. त्या कारणास्तव ह्या किल्ल्याला खूपच महत्व होते.  तसेच ह्या किल्ल्याचा इतिहासात काही ठिकावी उल्लेख सापडतो  १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता असा उल्लेख ऐतिहासिक कागद्पत्रामध्ये आढळतो. नंतर १८१८ च्या सुमारास इंग्रजांनी जुन्नर मधले अनेक किल्ले वर हल्ले करून ते नेस्तनाबूत केले गेले. हडसरवर सुद्धा इंग्रजांनी हल्ला चढला व त्याच्या अनेक वस्तू नष्ट केल्या गेल्या.

मार्ग - पुणे ते जुन्नर एस टी व खाजगी गाडीने हडसर गावापर्यंत जाऊ शकतो.
          मुंबई ते जुन्नर एस टी ने  येताना आळे फाटा, ओतूर , अहमदनगर ह्या एस टी ने सितेवाडी फाट्यावर             उतरावे व खाजगी वाहनाने हडसर गावापर्यंत येतात येईल.   

सोमवार, ३० मार्च, २०२०

किल्ले रोहिडगड( विचित्रगड )

                     किल्ले रोहिडगड( विचित्रगड ) 

महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मध्ये रोहिडगड उर्फ विचित्रगड हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून हा किल्ला समुद्रसपाटी पासून ३६६० फीट उंचीवर आहे. हा एक गिरिदुर्ग आहे. पुण्यापासून साधारणपणे ६० कि.मी. अंतरावर आहे. गडाच्या पायथ्यशी बाजारवाडी हे एक गाव आहे. हे गाव भोर पासून साधारणपणे ७ कि.मी. अंतरावर आहे. बाजारवाडी पर्यंत एस टी ची सोय असून खाजगी वाहनाने सुद्धा जाता येते. गडावर जाताना भोर मध्ये हॉटेल्स उपलब्ध आहे. बाजारवाडीला सुद्धा तुम्हाला छोटे छोटे हॉटेल्स आहे. तेथे तुम्ही नास्ता करून शकता.
गडाची चढाई बाजारवाडीच्या हायर सेकंडरी शाळे पासून गडावर चढाई सुरु होते. हा मार्ग सोपा व सोयीचा आहे. ह्या मार्गाने साधारणतः तासभर चढाई नंतर तुम्ही गडाच्या प्रवेशद्वार पर्यंत पोचता. त्यावर गणेश पट्टी व मिहरब आहे. काही पायऱ्या चढल्यावर गडाचे दुसरा दरवाजा लागतो. ह्या दरवाजा जवळच एक पाषाणात कोरलेले पाण्याचे ताक आहे. दुसऱ्या दरवाजाचे सिंह व शरबाचे शिल्प कोरलेले आहे. काही पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो. ह्या दरवाज्यावर हत्तीचे शिल्प आहे व दुसऱ्या बाजूस मराठी व पारशी भाषेत शीला लेख आहे. या गडावर दोन वास्तू  सदर तर दुसरी किल्लेदाराचे घर असावे. पुढे गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैरोबाचे मंदिर व त्यासमोर लहानसे टाक व एक दीपमाळ आहे. हा किल्ला तसा आकाराने लहान आहे. हा किल्ल्याला एकूण ६ बुरुज आहेत. शिरवळ, पाटणे, दामगुडे , वाघजाई, फत्ते व सदरेचा बुरुज
आहे.




ह्या किल्ल्याचा इतिहास पाहता हा यादवकालीन असून तिसऱ्या दरवाजावरील शिलालेखानुसार बिजारपूरचा मोहम्मद आदिल शाह याने गडाची पुनबांधणी केली. १६५६ साली हा किल्ला शिवाजी महाराजांनी रोहिडाचे देशमुख बांदल ह्यांना धारातीर्थी पडून स्वराजात सामील करून घेतला. देशमुख बांदल हयांचे वरिष्ट अधिकारी बाजीप्रभू देशपांडे यांना स्वराजाच्या मोहिमेत सामील करून घेतले. पुढे  १६६५ रोजी पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलच्या ताब्यात गेला परुंतु १६७० रोजी शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराजात सामील करून घेतला.




मार्ग - या गडावर जाण्यासाठी दोन बाजूनी मार्ग आहेत. एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्ग
चिखलावडे मार्गातून जाताना दोन मार्गे आहेत पण ते घोडे अवघड आहेत. ट्रेकसाठी या मार्गाचा उपयोग करतात.

   १) बाजारवाडी मार्ग - बाजारवाडी पर्यंत जाण्यासाठी एस टी सेवा उपलब्ध आहे बाजारवारी पासून मळलेली वाट गडाच्या पहिल्या दरवाजापाशी घेऊन जाते. वाट अत्यंत सोपी असून प्रवेश द्वारपर्यंत तास भरात घेऊन जाते. गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करतात. ती वाट लॅबची व निसरडी या वाटेने गडावर जाण्यास अडीच तास लागतात.
   २) चिखलवाडे मार्ग - चिखलवे खुर्द येथून टप्प्याचे नाकडं मार्ग किंवा चिखलावे ब्रुद्रुक येथून भैरवनाथ मंदिर मार्ग या गडावर जात येते हा मार्ग कठीण आहे.